कॉलेज कट्टा
बल्लारपूर- छत्रपती शिवराय म्हणजे देशाची आण,बान्,शान…अठरापगळ जाती एकत्रित करून त्यांना स्वराज्यात समानतेची वागणूक देणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या जयंती निमित्त संबंध महाराष्ट्रात महोत्सव सुरु असतांना बल्लारपूरचे संवेदनशील दिव्यांग बंधू भगिनीं कशा शांत बसणार…
19 फेब्रुवारी हा छत्रपति शिवाजी महाराज यांच्या जयंती ते औचित्य साधून शहरातील दिव्यांग बंधू भगिनींनी छत्रपति शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेवर मालयार्पण करून महाराजांना विनम्र अभिवादन केले…आणी महाराजांची जोरदार शिव गर्जना करण्यात आली.
यावेळी विकास भगत, मधुकर उमरे, कांचन भोरे, रूपा राठोड, प्रिया रामटेके, सुरेश केसकर, बादल वानखेडे, अनिल कोठारे, यादव, मिथुन कवाडे, रामेश्वर भोरे, आसिफ हुसेन शेख, गुणवंत धंदरे,विवेक पिंपडे इत्यादि दिव्यांग बंधू भगिनीं मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.




