राज्यात वादळवाऱा आणी गारपीठांसह सह अवकाळी पाऊसाचा धोका…

0
102

 

कॉलेज कट्टा न्यूज
चंद्रपूर (नरेंद्र सोनारकर): महाराष्ट्रात १८ ते २१ एप्रिल २०२६ या कालावधीत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा आणी विदर्भात ठिकठिकाणी मेघगर्जना, सोसाट्याचा वारा आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची (अवकाळी पाऊस) शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विशेषतः उत्तर महाराष्ट्र, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील (नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, नांदेड) जिल्ह्यांसह विदर्भातही वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचीही शक्यता आहे, त्यामुळे पुढील ४८ तासांचा इशारा देण्यात आला आहे.

का वाढलाय वादळ आणी अवकाळी चा धोका?
अरबी समुद्राकडून येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांमुळे (Moisture Incursion) वातावरणात बाष्पाचे प्रमाण वाढले आहे. हे बाष्प आणि जमिनीवरील वाढते तापमान यामुळे वातावरणीय अस्थिरता (Atmospheric Instability) निर्माण होऊन वादळी ढग तयार होत आहेत.
दक्षिण भारत ते मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेच्या कमी दाबाची एक रेषा (Trough) तयार झाली आहे. ही रेषा आर्द्रता खेचून घेत असल्याने ढगांची निर्मिती होऊन विजांच्या कडकडाटासह पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.

वातावरणीय अस्थिरता आणि उष्णताः
एप्रिल महिन्यातील वाढत्या तापमानामुळे (उदा. अकोल्यात ४४.२ अंश सेल्सिअस) जमीन तापत आहे. ही उष्ण हवा वर जाऊन वातावरणात अस्थिरता निर्माण करते, ज्यामुळे स्थानिक पातळीवर ‘गावठी वादळे’ किंवा गारपीठांचा पाऊस सक्रिय होतो.

पुढील ४८ तासात राज्यातील कोणत्या भागावर होणार परिणाम?
मराठवाडा :लातूर, धाराशिव (उस्मानाबाद), आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता सर्वाधिक आहे.
परभणी, बीड, हिंगोली आणि जालना जिल्ह्यांतही ढगाळ वातावरण आणि तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
विदर्भ:विदर्भात सध्या उष्णतेची लाट असली तरी,अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ आणी चंद्रपूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळ,गारपीठासह पावसाची शक्यता आहे.
कोकण:रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत १८ एप्रिलनंतर हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात, तर मुंबई आणि ठाणे परिसरात प्रामुख्याने उष्ण आणि दमट हवामान राहील.

महत्त्वाचा इशाराः
या पावसासोबत ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहू शकतात. काढणीला आलेल्या पिकांचे (गहू, हरभरा, आंबा) नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पिके सुरक्षित ठिकाणी हलविण्याचा इशारा देण्यात आला आहे.
एकंदरीत संभावीत वादळ,गारपीठ आणी अवकाळी पावसा मुळे जनजीवन विस्कळीत होण्याच्या डाट शक्यतायामुळे सर्वांनी सावधगिरी बाळगण्याची आवश्कता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here