कॉलेज कट्टा विशेष बातमी
चंद्रपूर(नरेंद्र सोनारकर):जनतेच्या हृद्यात स्थान मिळवून सलग सातव्यांदा विधान सभेत जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या,विकाससाचा झंजावत ,उच्च विद्याविभूषित आमदार सुधीर मुनगंटीवार यांना हेतू पुरस्पर मंत्री पदावरून डावलल्याने नाराज जिल्ह्यारील नाराज मतदारांनी चक्क भाजप कडे पाट फिरवत काँग्रेसला भरघोस मतदान केल्याची चर्चा जोर धरत असून राजुरा,मूल, बल्लारपूर येथे काँग्रेसाला मिळालेले घवघवीत यश हे कशाचे द्योत्यक आहे? असा प्रश्न राजकीय विश्लेषकांना पडला असून मुनगंटीवार यांच्याकडे मंत्रिपदाची सूत्रे असतांना त्यांनी आपल्या विधानसभेत विकास कामांसोबत संघटन कौशल्य आभाधित राखत मूल आणी बल्लारपूर नगर परिषदेवर एकहाती सत्ता राखण्यात यश मिळविले होते…
अजूनही मुख्यमंत्र्यांनी सुधीर मुनगंटीवार यांना मंत्री पदाची जबाबदारी न दिल्यास भविष्यातील जिल्हा परिषद आणी महापालिका निवडणुकीचा धोका ओळखून मुख्यमंत्र्यांनी मुनगंटीवार यांना मंत्रिपद न दिल्यास भविष्यातील निवडणुकीत भाजपला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तविली आहे…




