चंद्रपूरात कोणताही मतभेद नाही- मुख्यमंत्री फडणवीस

0
59

कॉलेज कट्टा न्यूज

चंद्रपूर :- चंद्रपूरमध्ये आयोजित विजय संकल्प रॅलीनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप-शिवसेना युतीला प्रचंड बहुमत मिळण्याचा विश्वास व्यक्त चंद्रपूरात नेत्यांमध्ये काही मतभेद नाहीत,सर्व नेते एकसंघ होऊनच ही निवडणूक जिंकतील,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चंद्रपूरच्या जनतेने दिलेल्या प्रतिसादातून हा विश्वास अधिक बळावला असल्याचे त्यांनी सांगितले. युतीच्या राजकारणात काहीवेळा पदे बाहेरच्यांना द्यावी लागतात, त्यामुळे काही त्याग करावे लागतात. चंद्रपूरकडे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याकडे पूर्ण लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. मनसेने ६६ बिनविरोध उमेदवारांच्या निवडीवर कोर्टात जाण्याच्या घेतलेल्या भूमिकेवर, फडणवीसांनी जनतेचा कौल महत्त्वाचा असल्याचे म्हटले. सुधीर मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातील वादाच्या चर्चा त्यांनी फेटाळून लावल्या. मुनगंटीवार आमचे ज्येष्ठ नेते असून, जोरगेवार आमदार आहेत, त्यांच्यात कोणताही मनभेद नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. चंद्रपूरच्या विकासात मुनगंटीवार, हंसराज भैय्या आणि जोरगेवार यांचे मोठे योगदान आहे. भाजपशिवाय अन्य कोणीही विकासाचे असे काम दाखवू शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here